Posts

जांच करनेवाले स्टाफ की जांच जरूरी..

Image
 .... हर हवाई अड्डेपर हवाई जहाज उड्डान भरनेसे  पहले जहाज की पुरी तरहसे जांच होती है..जहाजकी तकनीकी यंत्रणा जाची जाती है.... हवाई अड्डे पर कार्यरत  स्टाफ  यह जांच करता है....जांच होने के पश्चात  पायलट तथा हवाई जहाज का कोई भी कर्मचारी को वहा जानेकी या दुबारा जांच करने की इजाजत नहीं होती... इस्लिये हवाई अड्डे,के जिस Staff ने  दुर्घटना ग्रस्त  हवाई जहाज की overall जांच की थी .. उन सभी कर्मचारी योंकी  अलग अलग करके  जबानी लेनी चाहिए . सत्य सामने आ जायेगा ..जरुरत  पडणे पर सभिकी नार्को test करनी चाहिए i

भ्रष्ट अधिकाऱ्यांना जरब

Image
भ्रष्टाचाराविरुद्ध उग्र मोहीम सुरू करावी  मस्तवाल मनपा अधिकारी,  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन या सर्व शासकीय यंत्रणामधील माजोरी अधिकाऱ्यांनाचांगलीच जरब मिळाली आहे..  राज्याचे आक्रमक नेते आणि अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी या माजेल शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे . नुकतीच द्वारका सर्कल येथे नामदार छगन भुजबळ यांनी भेट दिली .सर्कल हटवून तेथे पथदीप यंत्रणा उभारण्याचे काम चालू आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी भुजबळ येथे गेले असता या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच उलट तपासणी केली. संबंधित विभागाचे काही प्रमुख अधिकारी नामदार छगन भुजबळ यांच्या पाहणी दौऱ्यासाठी त्यांच्याबरोबर आलेले नव्हते. ही बाब आमदार भुजबळ यांना प्रकर्षाने खटकली. मनपा अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी, किंवा पोलीस अधिकारी यांना हॉटेलिंग करण्यामध्ये किंवा तारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ आहे मात्र या कामांकडे लक्ष देण्यास वेळ नाही अशी अधिकाऱ्यांची कानउघाडणी ना. भुजबळ यांनी केली.  शासकीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार ...

वटवृक्ष

Image
फार छान लिहितोस.... नाशिकच्या पवित्र भूमी,तील एक लखलखते तेजस्वी रत्न म्हणजे आपले तात्यासाहेब... प्रथितयश साहित्यिक, ,श्री. वि, वा . शिरवाडकर, तथा मराठी भाषेचं एक अनमोल लेण.... कविश्रेष्ठ कुसुमाग्रज,..  तात्या साहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि तात्यासाहेब नावाचे एक नवे दैदिप्यमान पर्व नाशिक नगरीच्या इतिहासात सुरू झाले .तो काळ महाराष्ट्रभरातील साहित्यिक, कवी, कलावंत, काही जुने जाणते रसिक नागरिक,राजकारणी आदि सर्वांसाठी स्वर्ण काळ होता. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रसिक मराठी जना चा एक सलग प्रवाह नाशिक मध्ये काही वर्ष अव्याहत सुरू होता. ते सोन्याचे दिवस इतिहास जमा झालेत. काळाचे चक्र फिरत गेले आहे. तथापि स्मृती जागृत आहेत.  या स्मृती म्हणजे हृदयाच्या स्निग्धाळ कप्प्यांमध्ये चिरंतन स्वरूपात ठेवलेला अमूल्य दस्तावेज आहे. आज ,सहज जुनी पानं चाळता चाळता काही कात्रण हाती लागली, त्यातील एक सोन्याची झळाळी ल्यालेलं सुवर्णपान तुमच्या हाती देत आहे . तात्यासाहेब शिरवाडकर यांचा माझ्यावर विशेष लोभ होता दैनिकाच्या रोजच्या धबडक्याच्या कामात कुठही जायला वेळ मिळायचा नाही .कुट...

Yes.. चौकशी व्हायला हवी.

 अहमदाबाद येथील विमान अपघात ही अलीकडच्या काळातील भारतातील सर्वात दुःखदायी घटनांपैकी घटना आहे .सदर विमान केवळ अकरा वर्षे जुने होते .हवाई वाहतूक क्षेत्राच्या संदर्भात सदर विमान नवीन या सदरामध्येच मोडत होते .या जातीचे विमान क्वचितच अपघातग्रस्त होते इतकी त्याची बांधणी उत्तम , असून तांत्रिकदृष्ट्या  ही विमान श्रेष्ठ मानले जाते. सदर अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक यांना किमान 9000 तास विमान उड्डाणाचा दीर्घ अनुभव होता.  त्या सर्व बाबी पाहिल्यानंतर या अपघाताविषयी अनेक प्रश्न राष्ट्रीय तथा जागतिक स्तरावर देखील उपस्थित करण्यात येत आहेत .विमानाचे दोन इंजिन एकाच वेळेस बंद कसे पडू शकतात ..?हा एक प्रश्न आहे.. असा कोणता तांत्रिक बिघाड एकाएकी दोन्ही इंजिनामध्ये निर्माण झाला .?हा  शंकायुक्त प्रश्न सध्या विचारला जात आहे. आणखी एक विशेष विस्मय जनक बाब म्हणजे विमानातील सर्वच प्रवासी आणि वैमानिकासह अन्य कर्मचारी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला .बहुतेकांच्या शरीराचां कोळसा झाला. मात्र एक सुदैवी प्रवासी  आश्चर्यकारकरित्या वाचला आहे.. त्या जीवाचे खरोखर अभिनंदन केले पाहिजे .कोणत्य...

भूतकाळाचा कानोसा

Image
नासिक मधील एका तत्कालीन प्रथितयश दैनिकांमध्ये (आता या दैनिकाला कोण विचारत पण नाही..) कार्यकारी संपादक या पदावर कार्यरत असताना  " मुशाफिरी " हा कॉलम मी लिहित होतो .शेकडो समाजोपयोगी प्रश्नांना या स्तंभाद्वारे मी वाचा फोडली.. त्यामुळे मुशाफिरी हा स्तंभ प्रचंड गाजला. या स्तंभामार्फत विविध विषय हाताळले..लेखामुळे काही कामे मार्गी लागली.काही छोटे पूल, नदी वरील फरशा , लहान तलाव रस्ते आदी निर्माण झाले .जनतेची सोय झाली. विषयांना रोखठोकपणे हाताळण्याची माझी शैली वैविध्यपूर्ण होती.. अनेक पत्रकारांनी माझ्या या लेखनशैलीचे अनुकरण केले.. याच "मुशाफिरी "सदरातील एक हा लेख इथे प्रसिद्ध केला आहे . दिनांक 17 एप्रिल 1993 रोजी हा लेख मी प्रसिद्ध केला होता . सरकारी अधिकाऱ्यांची कामाची पद्धत सर्वसामान्य जनतेला चांगलीच माहित आहे. छोटी छोटी कामे कशा पद्धतीने अडवली जातात. आणि किती त्रास जनसामान्यांना होतो हा चिंताजनक विषय आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांची बैठक हा सदर मुशाफिरी लेखाचा विषय होता तत्कालीन विभागीय महसुल आयुक्त गिरीश गोखले यांनी चार जिल्ह्यांचे (त्यावेळी नाशिक, जळगाव ,...